मनोज एल खोब्रागडे
✍️मुख्य संपादक✍️
8208166961/9860020016
चंद्रपूर :- केंद्र सरकारच्या चुकीच्या आणि हुकूमशाही धोरणांमुळे आज देशात महागाईने उच्चांक गाठला आहे. सातत्याने वाढणाऱ्या पेट्रोल, डिझेल व गॅसच्या किमतींमुळे सामान्य नागरिक, महिला, शेतकरी आणि छोट्या व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. केंद्र सरकारच्या या जनविरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी चंद्रपूर शहरात काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष श्री. सुभाष धोटे, शहराध्यक्ष श्री. शिवा राव, ज्येष्ठ नेते विनायक बांगडे, महिला जिल्हाध्यक्षा सौ. कुंदा जेणेकर आणि शहराध्यक्षा सौ. चंदाताई वैरागडे, सर्व नगरसेवक, स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments