मनोज एल खोब्रागडे
✍🏻मुख्य संपादक ✍🏻
8208166961/9860020016
गडचिरोली :- गडचिरोलीला देशातील महत्त्वाचे स्टील हब म्हणून विकसित करताना औद्योगिक प्रगतीसोबत शेतकरी, स्थानिक नागरिक आणि युवकांचे हित जपले जाईल, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले.
महत्त्वाचे निर्णय :
🔹 शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच भूसंपादन
🔹 आवश्यक तेवढ्याच जमिनीचे संपादन
🔹 जनता दरबाराच्या धर्तीवर ‘उद्योग दरबार’
🔹 ४७५ ग्रामपंचायतींमध्ये ‘गाव तिथे उद्योजक’
🔹 स्थानिक युवकांना रोजगार व कौशल्य प्रशिक्षणाला प्राधान्य
🔹 उद्योग भवनाचे काम ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश
🔹 बांबू क्लस्टर व स्थानिक संसाधनांवर आधारित उद्योगांना चालना
🔹 पीएम विश्वकर्मा लाभार्थ्यांना बाजारपेठ व व्यवसायाशी जोडण्यावर भर
सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनीही उद्योगांना आवश्यक तेवढीच जमीन, प्रकल्पांची कालबद्ध अंमलबजावणी आणि स्थानिक युवकांना रोजगारात प्राधान्य देण्यावर भर दिला.
गडचिरोलीचा औद्योगिक विकास — शेतकरी हित, स्थानिक रोजगार आणि सर्वसमावेशक प्रगतीसोबत!

Post a Comment
0 Comments